मदनगड
मदनगड ह्या किल्ल्याची समुद्र
सपाटीपासून ऊंची ४९०० फुट आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. मदनगड किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो कळसूबाई डोंगररांगे मध्ये येतो आणि त्याची श्रेणी खूप कठीणआहे
सह्याद्रि मधील अत्यंत कठीण अशागाडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड होय. हा
किल्ला तसा बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम
सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे
डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही
किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो.
गडावर पहाण्याची ठिकाणे :
गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. मदनगडावरून अलंग, कुलंग ,छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर,त्रिबंकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास लागतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.
१ आंबेवाडी मार्गे :-
मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा – घोटी – पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला होय. येथून मदनवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायर्या लागतात.या पायर्या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात.
गडावर पहाण्याची ठिकाणे :
गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. मदनगडावरून अलंग, कुलंग ,छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर,त्रिबंकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास लागतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.
१ आंबेवाडी मार्गे :-
मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा – घोटी – पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला होय. येथून मदनवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायर्या लागतात.या पायर्या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात.
२ घोटी – भंडारदरा मार्गे
घाटघर :
किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी – भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.
किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी – भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.
राहण्याची सोय: गडावर एक गुहा आहे यात साधारण २० ते
३० जणांना राहता येते.
जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय: किल्ल्यावर पाकात फेब्रुबारीपर्यन्त पिण्यासाठी
पाणी उपलब्ध असत.
जाण्यासाठि लागणारा वेळ: आंबेवाडीतून ७ ते ८ तास
लागतात.
सूचना :
गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment