जीवधन किल्ल्याचे वर्णन
जीवधन
ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून ऊंची ३७५४फुट आहे. हा किल्ला पुणे
जिल्ह्यामध्ये येतो.जीवधन किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग असून तो नाणेघाट
डोंगररांगे मध्ये येतो आणि त्याची श्रेणी कठीण
आहे. घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला‘जीवधन’किल्ला
आहे. प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षनासाठी उभा केला होता. जीवधन
किल्ला नाणेघाटापासून थोडयाच अंतरावर आहे.
इतिहास:
शिवजन्माच्या
वेळी निजामशाही अस्ताला जात होती. आणि ह्याची साक्ष देणारा एकमेव किल्ला म्हणजे
जीवधन. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली . शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज
‘मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या किल्ल्यावर कैदेत असताना त्याला
सोडवून संगमनेरजवळ असणार्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. आणि त्याला निजामशहा
म्हणून घोषित केले. घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. घाटघर गावातील जमिनीचे
वैशिष्ट्या महंजे बांबूची बने. सारे जंगल हे बांबूच्या बनांचे आहे.
गोरक्षगडप्रमाणे या गडांचा दरवाजासुद्धा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:
पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच
गजलक्ष्मीचं शिल्प आहे. गावकरी याला ‘कोठी’ असे संबोधित. जवळच
पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाईदेवीचे मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात
एक अशी धान्यकोठार आहे. आत कमलपुष्पेकोरलेली आहेत. १८१८ मध्ये इंग्रज मराठेयुध्दात
या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठड्यांमध्ये आढळते. जीवधन किल्ल्याच्या
एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार
फुटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो.जीवधन किल्ल्याचा आकार आयतकृती आहे.
वांदरलिंगीच्या कोकणचे निसर्गरम्य दर्शन होते. समोरच ननाचा अंगठा ,हरिशचंद्रगड, हडसर, चावंड ,कुकडेश्र्वराचे
मंदिर,धसईचे, छोटेसे धरण , मालशेज घाटातील
काळे तुकतुकीत रास्ते न्याहाळता येतात. अशाप्रकारे हा जीवधन किल्ला चार ते पाच तासांत
पाहून होतो.
गडावर जाण्याच्या वाटा:
कल्याण –नगर मार्गाने नाणेघाट चढून गेल्यावर पठार
लागतो. या पठारावरून उजवीकडून जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात.हे
ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते.या कातळभिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट
वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, आणि डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी
पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या
पायर्या लागतात. सण १८१८ नंतर इंग्रजांनी हा मार्ग सुरुंग लावून चिणून काढला आणि
पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली.
गडावरजाणारी दुसरी वाट जुन्नर घाटघर मार्गे
राजदरवाज्याची आहे .ही वाट घाटघरहून सरळ
गडावर जाते. ही वाट अतिशय सोपी आहे.
राहण्याची सोय: गडावर राहण्याची
सोय नाही.
जेवणाची सोय: जेवणाची सोय आपण
स्वतःच करावी.
पाण्याची सोय: गडावर बारमाही
पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: २
तास
PDF File Download
Comments
Post a Comment